Maharashtra Agriculture News – कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन

Maharashtra Agriculture News – कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन :

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला असून त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 1923 -24 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांचे “प्रक्षेत्र भेट राज्या बाहेर “हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे . या कार्यक्रमा अंतर्गत राज्यात फलोत्पादनक शेतकऱ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच व फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी शेतस्तरावर करायची प्रक्रिया उद्योग स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व वाढणीपश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शाश्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करून देणे व या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतःची व त्याच्याबरोबर समूहाचे फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे याबाबतीसाठी शेतकऱ्यांचे राज्याबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात फळबाग भाजीपाला फुले लागवड विदेशी फळपीक लागवड आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेता येईल. शिवाय इतर महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, फुले लागवड, करणाऱ्या शेडनेटगृह व हरितगृह उभारणी, इत्यादी बाबत प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा संबंधित उपविभागीय कृषी कार्यकार्यांकडे आपले अर्ज,सात बरा,आधार कार्ड व छायाचित्रसह अर्ज करावा. असे कृषी विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

केंद्र सरकारची “विकसित भारत संपर्क संकल्प यात्रा” वाशिम जिल्ह्यात :

केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्या लाभार्थ्यांना अद्याप मिळालेला नाही. त्यांच्यापर्यंत योजनेची माहिती “विकसित भारत संकल्प यात्रा ” या मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्या लाभार्थ्यांना अद्याप मिळालेला नाही. अशा लाभार्थ्यांना केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास या यात्रेच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्यात येत आहे. या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात 23 नोव्हेंबर पासून चार डिजिटल व्हॅन यांच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील 114 ग्रामपंचायत मध्ये ही” विकसित भारत संकल्प यात्रा ” पोचली असून आतापर्यंत 23 हजार 576 नागरिक या यात्रे सहभागी झाले. जिल्ह्यातील एकूण 491 ग्रामपंचायतीपैकी 114 ग्रामपंचायतींत केंद्राच्या योजनेची माहिती या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून देण्यात आली केंद्राच्या विविध योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची ध्वनी चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. जिल्ह्यात या यात्रेदरम्यान 174 लाभार्थीने देखील केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळाल्याचे समाधान “मेरी कहानी मेरी जवानी” या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त केले. जिल्ह्यातील 114 गावात संकल्प यात्रा पोचली मतदान प्रक्रिये बाबतचे ईव्हीएम व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक या यात्रे दरम्यान मंगरूळपीर तालुक्यातील 31, मानोरा तालुक्यातील 32 आणि वाशिम तालुक्यातील 32 ग्रामपंचायतेत नागरिकांनी संबंधित गावात यात्रेदरम्यान बघितले. विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी 671 आणि जीवन ज्योती विमा योजनेसाठी १९ हजार ९२० नागरिकांनी अर्ज भरून दिले.केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन विकसित भारताचा संकल्प नागरिकांनी यात्रेदरम्यान केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *